विमानतळाच्या धावपट्ट्या २० नोव्हेंबरला बंद
विमानतळाच्या धावपट्ट्या २० नोव्हेंबरला बंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (सीएसएमआयए) दोन्ही धावपट्यांची २० नोव्हेंबरला देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे. दोन्ही क्रॉस रनवे सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे या वेळेत प्रवाशांना विमान प्रवास होणार नाही.
मुंबई विमानतळ हे जगातील सर्वाधिक वर्दळीच्या सिंगल-रनवे विमानतळांपैकी एक आहे. त्यामुळे या देखभाल कालावधीत विमान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विमानतळ प्रशासनाने आधीच विमान कंपन्या आणि विमान वाहतूक प्राधिकरणांना याची माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर उड्डाणांचे वेळापत्रक पुन्हा आखण्यात आले असून, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. दरवर्षी मॉन्सूननंतर धावपट्टीची तपासणी व दुरुस्ती केली जाते. या वेळी धावपट्ट्यांवरील झीज झालेल्या भागांची दुरुस्ती, ग्राउंड लाइट्सची तपासणी तसेच एरोनॉटिकल दिव्यांची अदलाबदल केली जाणार आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही सर्व कामे सहा तासांच्या आत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
मुंबई विमानतळ सुमारे १,९०० एकरांवर विस्तारलेले असून, दररोज सुमारे एक हजार विमानांची ये-जा येथे होते. आर्थिक वर्ष २०२४-२५मध्ये या विमानतळावरून तब्बल ५५.१२ दशलक्ष प्रवाशांनी प्रवास केला आहे. विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे, की नियोजित वेळेत उड्डाण करणाऱ्या विमानांची ताजी माहिती संबंधित विमान कंपन्यांकडून घ्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

