जंजिरा किल्ला हवामान पूर्ववत झाल्याने पुन्हा सुरु
जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी पुन्हा खुला!
आठवडाभर खराब हवामानामुळे होता बंद
मुरूड, ता. ४ (बातमीवार) : सततच्या पावसामुळे व खराब हवामानामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गेला आठवडाभर बंद ठेवलेला ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग आता ३ नोव्हेंबरपासून पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. खराब हवामानामुळे २६ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान किल्ला बंद असल्याने दूरवरून आलेल्या पर्यटकांची मोठी निराशा झाली होती; मात्र आता हवामान पूर्ववत आणि अनुकूल झाल्याने राजपुरी, दिघी आणि खोराबंदर येथून पर्यटकांना किल्ल्यावर जाता येणार आहे.
जंजिरा जल वाहतूक संस्थेचे सचिव नाजमुद्दीन कादिरी यांनी पर्यटकांना आता आवर्जून जंजिरा पाहण्यासाठी येण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या ताज्या मासळीच्या हंगामाचा आणि इथल्या निसर्गसौंदर्याचा तसेच पद्मदुर्ग, गोड माडीसारख्या स्थळांचा आनंद घेता येणार आहे.
पावसाळ्यात १ जून ते ३१ ऑगस्ट या काळात समुद्र अखवळलेला असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव जंजिरा किल्ल्यावरील प्रवासी वाहतूक पुरातत्त्व खात्याकडून बंद ठेवली जाते. यंदा अखंड पाऊस पडत राहिल्याने जंजिरा जल वाहतूक संस्थेतील कर्मचारी व बोटमालकांचा रोजगार कमी झाल्याने त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

