उलवेतून विकासाची दिशा
उलवेतून विकासाची दिशा
किनारी मार्गाचे ६० टक्के काम पूर्ण
नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर)ः नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, जेएनपीए, नवी मुंबई सेझ आणि आम्र मार्ग प्रादेशिक मार्गिकांदरम्यान सिडकोतर्फे उलवे किनारी मार्गाचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे उलवेतून नवी मुंबईच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा लिंक रोड कार्यान्वित झाल्यानंतर हा महामार्ग नवी मुंबईला जागतिक व्यापारासाठीचे प्रवेशद्वार बनणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आर्थिक विकासाकरिता हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. उलवे किनारी मार्ग हा नवी मुंबईतील परिवहन क्षमता सक्षम करणारा असून, ऐतिहासिक पायाभूत सुविधा प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पांतर्गत उड्डाणपूल, मोठे पूल, रेल्वेमार्गावरील पूल आणि अन्य महत्त्वाची बांधकामे अंतर्भूत आहेत. तसेच संपूर्ण मार्गावर ऊर्जा-कार्यक्षम एलईडी दिवे, अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा, लेन मार्किंग, ॲन्टी-क्रॅश बॅरिअर आणि स्मार्ट वाहतूक व्यवस्थापन पायाभूत सुविधा आहेत. त्यामुळे सुरक्षित, सुरळीत प्रवास सुनिश्चित होणार आहे. देशातील सर्वांत महत्त्वाकांक्षी विमानतळ प्रकल्प आणि सर्वाधिक लांबीचा सागरी पूल यांना जोडणारा हा महत्त्वपूर्ण नागरी प्रकल्प आहे.
------------------------------------
सेतूची रचना ः
एकूण लांबी ः ७ किलोमीटर
किनारी मार्गाचा टप्पा : ५.८० किलोमीटर (सहा पदरी उन्नत मार्ग)
विमानतळ लिंक रोड : ०.९०३ किलोमीटर (थेट विमानतळाला जोडणारा टप्पा)
अंदाजित खर्च ः १,४०० ते १,६०० कोटी
प्रकल्पाचे काम ः ६० टक्के पूर्ण
ृः कार्यान्वित ः २०२६ पर्यंत
------------------------------
पर्यावरणाचे रक्षण
नवी मुंबईतील दळणवळण आणि आर्थिक विकासाला हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मोठी गती मिळणार आहे. उलवे किनारा मार्ग हा सिडकोमार्फत नवी मुंबईमध्ये विकसित केला जाणारा एक महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू यांना थेट जोडणारा एक महत्त्वपूर्ण दुवा ठरणार आहे. पर्यावरणाचे रक्षणासाठी संपूर्ण रस्ता स्टिल्ट्सवर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
--------------------------
वेळेत बचत
- मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान अखंडित आणि सिग्नल-रहित प्रवास शक्य होणार आहे. या रस्त्यामुळे सध्याच्या मार्गावरील प्रवासाचा वेळ २५ मिनिटांनी कमी होईल, ज्यामुळे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास सुलभ होईल.
- या रस्त्यामुळे लॉजिस्टिक्स आणि प्रादेशिक व्यापारासारख्या व्यावसायिक क्षेत्रांना मोठा फायदा होईल. ज्यामुळे परिसराचा आर्थिक विकास वाढेल. उलवे कोस्टल रोडमुळे उलवे परिसर विकसित उपनगरीय केंद्र म्हणून उदय होण्यास मदत होईल. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला फायदा होणार आहे.
-------------------------
आधुनिक सुविधा
रस्त्यावर ऊर्जा-कार्यक्षम एलईडे दिवे, अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा, लेन मार्किंग आणि अँटी-क्रॅश बॅरिअर्स यांसारख्या आधुनिक सुविधा असतील, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत होईल. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर नवी मुंबई जागतिक व्यापाराचे प्रवेशद्वार बनणार आहे.
---------------------------------
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास मार्गामुळे सिग्नलविरहित होणार आहे. तसेच सध्या अस्तित्वात असलेला पाम बीच मार्ग, आम्र मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग ३४८ मार्गांवरील ताण कमी करणे, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
- विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

