दरबारात पालकमंत्री गणेश नाईक यांनी वाचला विकास

दरबारात पालकमंत्री गणेश नाईक यांनी वाचला विकास

Published on

पालकमंत्री नाईक यांच्या दरबारात
नागरिकांच्या तक्रारी
नालासोपारा, ता. १४ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेच्या प्रभागाची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. त्याला दोन दिवस होत नाही तर पालकमंत्री गणेश नाईक यांनी शुक्रवारी (ता. १४ ) विरारमध्ये प्रशासकीय अधिकारीविनाच जनता दरबार घेतला. यात त्यांनी विकासकामांचा आराखडाच वाचला आहे. या जनता दरबारात २०० हून अधिक नागरिकांनी तक्रारी मांडल्या, पण त्या तक्रारी पालकमंत्र्यांनी ऐकून घेऊन सोडवण्याचे फक्त आश्वासनच दिले. त्यामुळे आजच्या जनता दरबारात भाजप पदाधिकारी समाधानी, पण सर्वसामान्य नागरिक मात्र असमाधानी होऊन परतले.
पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे आणि व्यासपीठावर भाजप सेनेचे पदाधिकारी होते. या वेळी नागरिकांनी विविध समस्या मांडल्या. वाहतूक कोंडीची समस्या, उद्यानांमधील तुटलेली खेळणी, नायगाव पश्चिमेकडील रेल्वेस्थानकाजवळ असलेले अनधिकृत वाहनतळ, पाण्याची समस्या, जिल्हा परिषद मराठी शाळा कामण येथील कमी असलेले शिक्षक, चिंचोटी-कामण-अंजूरफाटा रस्त्याची दुरवस्था अशा विविध समस्या मांडल्या. तब्ब्ल २०० हून अधिक तक्रारींची नोंद जनतादरबारात करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com