विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Published on

कल्याणमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या
मराठी-अमराठी वादातून मानसिक तणावातून टोकाचे पाऊल


कल्याण, ता. २० (बातमीदार) : कल्याण पूर्व तिसगाव नाका परिसरातील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अर्णव जितेंद्र खैरे (वय १९) असे त्याचे नाव आहे. त्याने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. लोकल ट्रेनमध्ये झालेल्या मारहाणीनंतर मानसिक तणावाखाली येऊन त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय त्याच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. याबाबत कोळसेवाडी पोलिस ठाण्यात त्यांनी माहिती दिली आहे.
अर्णव खैरे मंगळवारी (ता. १९) लोकल ट्रेनने मुलुंड येथील महाविद्यालयाकडे जात होता. यादरम्यान झालेल्या मराठी-अमराठी वादातून त्याला चार ते पाच जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला. या मारहाणीमुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातूनच अर्णवने गळफास घेत आत्महत्या केल्याचा संशय त्यांनी पोलिसांकडे नोंदवला आहे.
ट्रेनमध्ये घडलेला प्रकार अर्णवने आपल्या वडिलांना कळवळा होता. त्यानुसार त्यांनी त्याला धीरही दिला होता, मात्र सायंकाळी वडील घरी परतले, तेव्हा अर्णवने आत्महत्या केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अर्णवच्या वडिलांनी पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, रेल्वेस्थानक परिसरातील कर्मचारी व सीसीटीव्हीच्या आधारे संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी माध्यमांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com