खड्डयांचे प्रकऱण
खड्ड्यांबाबत न्यायालयाचे पालिकांवर ताशेरे
सम प्रमाणात भरपाई देण्याचे आदेश देऊ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबई आणि आसपासच्या परिसरातील खड्ड्यांमुळे जखमी किंवा जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याबाबत हद्दीचा मुद्दा उपस्थित करून जबाबदारी झटकण्याच्या भूमिकेवरून उच्च न्यायालयाने मुंबई, ठाणे महापालिकांसह अन्य प्राधिकरणांना सोमवारी (ता. २४) धारेवर धरले. तसेच हा मुद्दा सामंजस्याने सोडवा अन्यथा सर्व प्राधिकरणांना सम प्रमाणात भरपाई देण्याचे आदेश देऊ, असा इशाराही न्यायालयाने दिला.
रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांची जबाबदारी घेण्याऐवजी महापालिका आणि अन्य प्राधिकरणांचे अधिकारी एकमेकांना दोष देतात. तथापि, आम्ही तुम्हाला सम प्रमाणात भरपाई देण्याचे आदेश देऊ, मग तुम्ही सर्व जण आपापसात भांडत बसा आणि नंतर संबंधित प्राधिकरणाकडून भरपाईची रक्कम वसूल करा, असेही न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठाने सुनावले. विक्रोळी येथे एका दुचाकीस्वाराचा खड्ड्यांमुळे मृत्यू झाला होता. त्यासंदर्भात एमएमआरडीए व महापालिका यांच्यात रस्ता कोणाचा, यावरून मतभेद झाले होते. डोंबिवलीत उघड्या नाल्यात १३ वर्षांचा मुलगा वाहून गेला. त्याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिका आणि एमएमआरडीएमध्येही हद्दीवरून वाद आहे. त्याचीही न्यायालयाने दखल घेतली आणि जबाबदारी झटकण्याची भूमिका खपवून घेतली जाणार नसल्याचे सुनावले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

