पवई शाळेत नवीन केंद्र सुरू
डिजिटल साक्षरता कार्यक्रमाचा विस्तार
पवई शाळेत नवीन केंद्र सुरू
घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) : डिजिटल समावेशनाच्या दिशेने मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादावर आधारित, एसुस इंडिया आणि विद्या इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फॉर युथ अँड ॲडल्ट्स यांनी महाराष्ट्रात नवीन शिक्षण केंद्र सुरू करून डिजिटल साक्षरता कार्यक्रमाचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून राजीव गांधी मराठी माध्यम पवई शाळेत नवीन डिजिटल साक्षरता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. पश्चिम भारतातील सहा हजारांहून अधिक वंचित मुले आणि तरुणांपर्यंत पोहोचलेल्या या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे सरकारी व कमी उत्पन्न गटातील शाळांमध्ये तंत्रज्ञान-सक्षम शिक्षण पोहोचवून डिजिटल दरी भरून काढणे हा आहे.
या भागीदारीद्वारे, एसुस आणि विद्या युनेस्को हे डिजिटल साक्षरता फ्रेमवर्कशी सुसंगत डिजिटल प्रयोगशाळा स्थापन करत आहेत, इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तसेच स्थानिक तरुणांना संगणक मूलभूत शिक्षण, कोडिंग, सर्जनशील डिझाइन, डिजिटल नीतिमत्ता यांसह विविध डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण देत आहेत. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना भविष्यातील शिक्षण, करिअर आणि रोजगाराच्या संधींसाठी सक्षम बनवण्यावर भर देतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

