मुंबईत विजेची मागणी गारठली

मुंबईत विजेची मागणी गारठली

Published on

मुंबईत विजेची मागणी गारठली!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईत गेल्या चार दिवसांत जाणवत असलेल्या थंडीमुळे विजेची मागणी गारठली आहे. वातारणातील गारव्यामुळे मुंबईकरांनी एसी, पंखे, कूलरचा वापर कमी केला आहे. त्यामुळे आज मागील आठवड्यातील विजेच्या मागणीचा विचार करता ५००-७०० मेगावाॅटने घट नोंदल्याने ती एकूण २,५०० मेगावाॅटपर्यंत खाली आली आहे. पुढील आठवडाभर ही परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
मुंबईची विजेची कमाल मागणी ४,२०० मेगावाॅट आहे. सध्या हिवाळा सुरू असल्याने सरासरी तीन हजार मेगावाॅटहून अधिक विजेची मागणी नोंदली जात होती. मात्र, चार दिवसांपासून तापमानाचा पारा घसरला आहे. तसेच आज १७ अंश एवढ्या किमान तापमानाची नोंदी झाली आहे. वातारवणात असलेल्या या गारव्याचा थेट परिणाम एसी, पंखे, कुलरच्या वापरावर झाला आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत घट झाल्याचे विद्युतभार प्रेषण केंद्राच्या आकडेवारीवरून दिसत आहे. तसेच मुंबई वगळता राज्याच्या विजेची मागणी घटली असून आज महावितरणकडे सुमारे १८ हजार ५०० मेगावाॅट एवढी विजेची मागणी नोंदली आहे. दरम्यान, मुंबईची विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी टाटा पाॅवरने ७७२ मेगावाॅट, अदाणीच्या हडाणू वीज केंद्रातून सुमारे ३०० मेगावाॅट, तर एक्स्चेंजमधून १,३७५ मेगावाॅट एवढी वीज घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com