लाडक्या बहिणींची धावपळ
लाडक्या बहिणींची धावपळ
ई-केवायसीसाठी उरले अवघे सहा दिवस
जव्हार, ता.२४ (बातमीदार)ः ‘लाडकी बहीण योजने’ च्या माध्यमातून महिलांना दिलासा मिळाला आहे. शहर तथा ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक अडचणीतून जर सुटका झाली असली तरी ई-केवायसी करण्यासाठी सहा दिवस उरल्याने महिलांची धावपळ उडत आहे.
लाडकी बहीण योजनेतील हजारो लाभार्थ्यांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. या योजनेतील पात्र महिलांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत ईकेवायसी करणे राज्य सरकारे नबंधनकारक केले होते. या योजनेचा जव्हार तालुक्यातील ३४ हजार ४७४ बहिणींनी लाभ घेतला आहे. मात्र, आतापर्यंत २१ हजार महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असल्याने १३ हजारांहून अधिक लाभार्थी अपात्र ठरण्याच्या दाट आहे. त्यामुळे आता शेवटचा एक आठवडा शिल्लक आहे.
-------------------------------------------
तालुक्यातील ग्रामीण भागात विद्युत पुरवठा खंडित होणे, इंटरनेटच्या अडचणी, ईकेवायसीसाठी लागणारे साधन सामग्री उपलब्ध नसल्याकारणाने अजून मुदत वाढ मिळावी, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.
- ॲड. योगिता मुलगीर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

