नदीच्या पुलावर संरक्षक कठडे बांधण्याची मागणी
मुरबाड, ता. २४ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील चासोळे व न्याहाडी गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील नदीच्या पुलावर तातडीने संरक्षक कठडे बांधण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात आहे. पावसाळा संपल्यानंतर पुलावर लोखंडी रेलिंग बसविण्याचे काम हाती घेतले जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभाग, मुरबाडचे उपविभागीय अभियंत्यांनी पत्राद्वारे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांना दिले होते. मात्र, अद्यापही या पुलावर संरक्षक कठडे बांधण्याचे काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दोन्ही पुलांवर संरक्षक कठडे नसल्यामुळे यापूर्वी गंभीर अपघात घडले आहेत. दोन वर्षांपूर्वी चासोळे गावातील जयेश आलम; तसेच वालीवरे गावातील खाकर दाम्पत्य यांचा पुलावर अपघात झाला होता. यावर्षी एप्रिलमध्ये रात्रीच्या वेळी दुचाकी पुलावरून नदीत कोसळल्याने फुलवा अन्सारी या युवकाला आपला जीव गमवावा लागला होता. या घटनांनंतरही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली गेली नाही, यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे. अपघातानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मुरबाड येथील उपविभागीय अभियंत्यांनी पावसाळा संपल्यानंतर रेलिंगचे काम हाती घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पावसाळा संपून बराच काळ लोटला असतानाही काम सुरू झालेले नाही. शासकीय अधिकारी अजून किती जीव जाण्याची वाट पाहत आहेत, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

