केडीएमसी अ प्रभाग पायाभूत, मूलभूत सुविधांपासून वंचित

केडीएमसी अ प्रभाग पायाभूत, मूलभूत सुविधांपासून वंचित

Published on

‘अ’ प्रभाग विकासापासून वंचित
मुलभूत सुविधांचा अभाव, पाणी-कचरा-रस्त्यांचे प्रश्न गंभीर
कल्याण, ता. २८ (वार्ताहर) : कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातील ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील परिसर अविकसित ग्रामीण परिसर असून ३२ वर्षांच्या कालावधीत मुलभूत, पायाभूत सुविधा या प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे दुर्लक्षित राहिला आहे. स्थानिक माजी नगरसेविकांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील सोयीसुविधांप्रश्नी अ प्रभाग वंचित राहिला असल्याचे चित्र सद्यस्थितीत दिसत आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेचा भाग असतानाही अ प्रभाग परिसर विकासापासून पूर्णतः अलिप्त आहे. या परिसरातील नागरिकांना मुलभूत सुविधा देखील अद्याप मिळालेल्या नाहीत. तर, स्थानिक लोकप्रतिनिधींकडून देखील या भागाच्या विकासासाठी फारसे प्रयत्न झालेले दिसत नाहीत. महापालिका प्रशासनाकडून या भागात वैद्यकीय महाविद्यालय आणि आणि रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले असले तरी मागील दहा वर्षात हा प्रस्ताव कागदावरून पुढे सरकलेला नाही. तर रुग्णालयासाठी आरक्षित असलेल्या या जागेवर अतिक्रमणे झाली आहेत. आंबिवली, अटाळी इंदिरारानगर, बंदरपाडा मांडा पश्चिम, टिटवाळा पूर्व बल्याणी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळी उभ्या राहिल्या आहेत. अनाधिकृत बांधकामे रोखण्यात प्रशासनाची उदासीन भूमिका दिसून येते.
या भागातील मुख्य रस्ता वगळता इतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. तर, गटारे बांधण्याचा विसर पडल्याने सांडपाणी रस्त्यावरुनच वाहत असल्याचे दिसते. यातूनच नागरिकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. टिटवाळा महागणपती हा मुंबई आणि उपनगरातील नागरिकाचे श्रद्धास्थान असल्याने दररोजच दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करतात. मात्र, गणेश मंदिर परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याचा जणू प्रशासानाला विसर पडला असून हा प्रस्ताव कागदावरच रेंगाळला आहे.

पिण्याच्या पाण्याला बोअरिंगचा आधार
या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील भेडसावत असून बोअरिंगच्या पाण्याचा आधार घ्यावा लागतो. पालिका प्रशासनाकडून पाण्याच्या पाइपलाइनसाठी प्रस्ताव मंजूर करण्यात आला असला तरी निधीचे कारण देत हे काम रखडले आहे. यामुळे पाण्यासाठी नागरिकाचे हाल सुरूच आहेत.

कचऱ्याचा गंभीर प्रश्न
या भागातील कचरा कल्याणच्या भरावभूमीवर आणावा लागत असून मांडा परिसरात कचरा प्रक्रिया केंद्र प्रस्तावित करण्यात आले असले तरी या केंद्राचे काम कासवगतीने सुरु आहे. तर अ प्रभागापासून कल्याण अंतर जास्त असल्याने अनेक भागातील कचरा नियमित उचलला जात नाही. साहजिकच रस्त्याच्या कडेला कचऱ्यानेच भाविकांचे स्वागत केले जात असल्याचे वास्तव आहे. हा कचरा कुजल्याने पसरणारी दुर्गंधी, रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे नागरिकाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com