प्रभावशाली कुटुंबाचा निवडणुकीमध्ये वरचष्मा
तुर्भे, ता. ३० (बातमीदार) : नवी मुंबईतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका कुटुंबातील तब्बल दोन ते तीन सदस्य वेगवेगळ्या प्रभागांतून निवडणूक लढवत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असताना, यंदाच्या निवडणुकीतही घराणेशाहीचा प्रभाव प्रकर्षाने जाणवत आहे. माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे पत्नी, मुले, भाऊ किंवा नातेवाइकांना उमेदवारी दिल्याचे चित्र दिसून येत आहे.
राजकीय पक्षांकडून ‘नवे चेहरे’ आणि ‘तरुण नेतृत्व’ याबाबत घोषणा केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात मात्र जुनेच राजकीय कुटुंबे पुन्हा मैदानात उतरल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. विशेष म्हणजे, काही प्रभागांमध्ये एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या पक्षांतून किंवा वेगवेगळ्या निवडणुकांत सातत्याने उमेदवार राहत असल्याने, लोकशाहीतील समान संधीच्या तत्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संबंधित कुटुंबाचा राजकारणातील जुना प्रभाव लक्षात घेता, तिकीटवाटपाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एकाच घरातील दोन ते तीन उमेदवारांना संधी दिल्यामुळे सामान्य कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. स्थानिक पातळीवर नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी, अशी मागणी जोर धरत असताना, काही पक्षांनी पुन्हा घरातीलच उमेदवारांवर विश्वास टाकल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे ‘सामान्य कार्यकर्त्यांना डावलले जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

