डोंबिवलीचा पाणीपुरवठा मंगळवारी १२ तास बंद
डोंबिवलीचा पाणीपुरवठा मंगळवारी १२ तास बंद
खंबाळपाडा जलवाहिनीची गळती रोखण्यासाठी दुरुस्तीचे काम
डोंबिवली, ता. २८ ः शहराचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारी (ता. ३०) सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत एकूण १२ तास बंद राहणार आहे. खंबाळपाडा परिसरातील जलकुंभाच्या जलवाहिनीला लागलेली मोठी गळती थांबविण्यासाठी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या अमृत योजना-२ अंतर्गत खंबाळपाडा भागात उभारण्यात आलेल्या उंच जलकुंभाची अंतर्गत जलवाहिनी पालिकेच्या मुख्य जलवाहिनीशी जोडण्यात आली आहे; मात्र या जोडणीच्या ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत आहे. हे पाणी वाया जात असल्याने आणि परिसरात पसरत असल्याने मंगळवारी तेथे नवीन जोडसांधा बसविण्याचे काम केले जाणार आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे नेतिवली जलशुद्धीकरण केंद्र १२ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल. दुरुस्तीनंतर बुधवारी सकाळचा पाणीपुरवठादेखील कमी दाबाने होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महापालिकेचे आवाहन
मंगळवारी दिवसभर पाणी नसल्यामुळे नागरिकांनी सोमवारपासूनच आवश्यक पाण्याचा साठा करून ठेवावा आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

