वांद्रापाडा–शास्त्रीनगरमध्ये आरोग्याचा प्रश्न गंभीर
अंबरनाथ, ता. ३१ (वार्ताहर) : पश्चिमेतील वांद्रापाडा-शास्त्रीनगर प्रभागात केवळ चार सफाई कर्मचाऱ्यांवर नऊ हजार लोकसंख्येची जबाबदारी असल्याने स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अपुरी साफसफाई, साचलेला कचरा, नाल्यांची नीट स्वच्छता न होणे यामुळे आरोग्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे स्वच्छतेसाठी किमान १४ सफाई कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक विकास सोमेश्वर यांनी केली आहे.
विकास सोमेश्वर यांनी मंगळवारी नगरपालिका कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली. नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर त्यांनी प्रभाग क्रमांक १० ची पाहणी केली असता दैनंदिन स्वच्छता नियमित व प्रभावीपणे होत नसल्याचे आढळून आले. अनेक ठिकाणी कचरा साचलेला असून काही भागांत नालेसफाई अपुरी आहे. मोठी लोकसंख्या असलेल्या या प्रभागात आरोग्य खात्याकडून केवळ चारच सफाई कर्मचारी कार्यरत असल्याने स्वच्छतेवर मर्यादा येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. अपुऱ्या स्वच्छतेमुळे माशा व मच्छरांचे प्रमाण वाढले आहे. ताप, सर्दी, खोकला आदी आजारांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या चार कर्मचाऱ्यांऐवजी दररोज किमान १४ सफाई कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत, अशी ठोस मागणी त्यांनी तक्रारीत केली आहे.
स्वच्छता करावी
नगरपालिकेच्या अनेक विभागांत काही सफाई कर्मचारी शिपाई आणि लिपिक म्हणून काम करत आहे, त्यांना आरोग्य विभागाच्या स्वच्छता निरीक्षकांनी प्रभागात सफाई करण्यासाठी पाठवावे. ज्याची नियुक्ती ज्या कामासाठी झाली, ते काम त्यांना द्यावे आणि प्रभागात सफाई करण्यासाठी पाठवावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

