वाशी विभागात एकच अर्ज बाद
तुर्भे, ता. १ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रभागांतील उमेदवारांच्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महापालिका हद्दीत एकूण ९५६ अर्ज दाखल झाले होते. यापैकी ८३९ अर्ज वैध ठरले असून ११७ अर्ज विविध कारणांमुळे अवैध ठरवण्यात आले आहेत. या छाननी प्रक्रियेत वाशी विभागातून एकमेव अर्ज बाद झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
वाशी विभागात दाखल झालेल्या १०२ पैकी १०१ अर्ज वैध ठरले असून फक्त एक अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा अवैध ठरलेला अर्ज प्रभाग क्रमांक १७-अ मधील भाजपचे उमेदवार नीलेश भोजने यांचा आहे. अर्ज बाद झाल्यामुळे प्रभाग १७-अ मधील निवडणुकीचे गणित मोठ्या प्रमाणात बदलले असून, याचा थेट फायदा शिवसेनेचे उमेदवार किशोर पाटकर आणि त्यांच्या पॅनेलला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी मैदानाबाहेर गेल्याने १७ अ या प्रभागातून शिवसेना उमेदवाराचा विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, अन्य विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अर्ज बाद झालेले दिसून येतात. नेरूळ विभागात तब्बल २८ अर्ज अवैध ठरले असून घणसोली विभागात सर्वाधिक ३९ अर्ज बाद झाले आहेत. याच्या तुलनेत वाशी विभागात अत्यंत काटेकोर तयारीमुळे आणि अचूक कागदपत्रांच्या पूर्ततेमुळे अवघा एकच अर्ज बाद झाल्याचे स्पष्ट होते.
अर्ज छाननीनंतर आता माघार प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, येत्या काही दिवसांत अंतिम निवडणूक चित्र अधिक स्पष्ट होणार आहे; मात्र प्रभाग १७-अ मध्ये भाजप उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने शिवसेनेची आघाडी भक्कम झाली आहे. हा प्रभाग शिवसेनेच्या बाजूने झुकत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

