मिरा भाईंदरमध्ये ३२ उमेदवारी अर्ज छाननीत बाद

मिरा भाईंदरमध्ये ३२ उमेदवारी अर्ज छाननीत बाद

Published on

मिरा भाईंदरमध्ये ३२ उमेदवारी अर्ज छाननीत बाद
भाईंदर, ता. १ (बातमीदार) : मिरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांपैकी छाननीमध्ये ३२ अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे सध्या ५४८ उमेदवार रिंगणात उरले आहेत. शुक्रवारी (ता. २) उमेदवारी मागे घेण्याचा दिवस आहे. त्या वेळी उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर निवडणूक रिंगणात किती उमेदवार शिल्ल्क राहणार आहेत, हे निश्चित होणार आहे.
३० डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकंदर ६३१ अर्ज दाखल झाले होते. परंतु त्यात एकाच उमेदवाराने एकापेक्षा जास्त अथवा एकाच प्रभागात दोन ठिकाणी अर्ज केले होते. छाननीच्या वेळी उमेदवारांनी आपण कोणत्या जागेवर उभे राहणार हे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे ३२ उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद ठरले. त्यानंतर उमेदवारांची संख्या ५४८ झाली आहे. उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी (ता. ३१) पार पडली. मात्र या छाननीचा अंतिम अहवाल गुरुवारी (ता. १) सायंकाळी जाहीर करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com