कारिवणे ग्रामपंचायतीचा वनराई बंधारा उपक्रम ठरला लोकचळवळ
कारिवणे ग्रामपंचायतीचा वनराई बंधारा उपक्रम ठरला लोकचळवळ
श्रीवर्धन, ता. ७ (वार्ताहर) : रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत बुधवार, ७ जानेवारी रोजी संपूर्ण जिल्ह्यात एकाच दिवशी ‘वनराई बंधारा बांधणे’ मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला कारिवणे ग्रामपंचायतीने अभूतपूर्व प्रतिसाद देत जलसंधारणाच्या दिशेने एक आदर्श आणि प्रेरणादायी पाऊल टाकले आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या धोरणातून प्रेरणा घेत कारिवणे ग्रामस्थांनी जलसमृद्धीचा वसा स्वीकारत एकत्रितपणे श्रमदान केले. माजी सभापती बाबुराव चोरगे, सरपंच गीता चोरगे, उपसरपंच बबन जोशी, कृषी अधिकारी सयाजी इंगळे, ग्रामपंचायत अधिकारी अभिजित माने, कृषी सहाय्यक दत्तात्रय कुंभारकर, अक्षय चोरगे यांच्यासह ग्रामस्थ, युवक मंडळ व महिला बचत गटांच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ग्रामस्थांच्या सामूहिक श्रमदानातून उभारलेले हे वनराई बंधारे केवळ तात्पुरते पाण्याचे साठे नसून, दीर्घकालीन जलसंधारणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. यामुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवले जाऊन भूजल पातळी वाढण्यास मदत, शेतीला बळकटी आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यास हातभार लागणार असल्याचा विश्वास ग्रामपंचायत प्रशासनाने व्यक्त केला आहे. लोकसहभागामुळे हा उपक्रम केवळ शासकीय कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता, एक खऱ्या अर्थाने लोकचळवळ ठरला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

