मुंबईत बांग्लादेशी किती, केंद्राला पत्ता नाही

मुंबईत बांग्लादेशी किती, केंद्राला पत्ता नाही

Published on

मुंबईत बांगलादेशी किती,
केंद्राला पत्ता नाही : सचिन सावंत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबईत तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडले आणि परत पाठवले, या प्रश्नाचे उत्तर, आकडेवारी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे नाही. माहिती अधिकारात मिळालेल्या या उत्तरातून भाजपचे कुभांड उघड झाले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून केंद्रीय गृह मंत्रालयाला तीन वर्षांत मुंबईत किती बांगलादेशी-रोहिंग्या पकडले, मुंबई पोलिसांनी किती प्रकरणे ‘एआरआरओ’कडे सोपविली तसेच कितींना बांगलादेशात परत पाठवले यांची दरमहा आकडेवारी व संपूर्ण माहिती मागितली असता, त्यात ‘आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही’ असे सांगण्यात आले, असे सचिन सावंत यांनी सांगितले. ज्या गृहमंत्रालयाकडे हे काम आहे त्या विभागात माहिती उपलब्ध नाही, असे उत्तर मिळाले आणि एका विभागातून दुसरीकडे टोलवाटोलवी चालू असेल तर किती खालच्या पातळीवर हे राजकारण होत आहे, हे मुंबईकरांनी ओळखावे, असे आवाहन सावंत यांनी केले.

मुंबई पालिका निवडणुका येताच भाजप नेते मंगलप्रभात लोढा आणि अमित साटम यांनी हिंदू-मुस्लीम मुद्दा उकरून काढला; मात्र मुंबईतून मागील तीन वर्षांत किती बांगलादेशी पकडले, याची अधिकृत माहिती त्यांनी जाहीर करावी, असे खुले आव्हान सावंत यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com