ऊन्हाळी दुबार पिकासाठी संस्था आणि तज्ञांचा पुढाकार.
''वनराई''च्या माध्यमातून दुबार भात पिकाचे मार्गदर्शन
मोखाडा, ता. १० (बातमीदार) ः मोखाड्यात केवळ पावसाच्या पाण्यावर खरीप हंगामाची शेती केली जाते. परंतु, मोखाड्यातील काही भागात उन्हाळी शेती करून दुबार पीकही घेता येईल ही संकल्पना आखत वनराई संस्थेच्या माध्यमातून कृषी शास्त्रज्ञ भरत कुशारे यांनी उन्हाळी भात मलचिंग शेती, सूर्यफूल, आंबा लागवड व व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले.
मोखाड्यात खरीप हंगामातील शेती हाच एकमेव उत्पन्नाचा स्त्रोत आहे. तालुक्यात खरीपाचे सुमारे १२ हजार ५०० हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये दोन हजार हेक्टर क्षेत्र भात पीकाचे आहे. येथील संपूर्ण शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. खरीप हंगामानंतर या भागात बेरोजगारीचे प्रमाण वाढते. हाताला काम नसल्याने येथील शेतकरी आणि शेतमजूर रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर करतात. या स्थलांतराला आळा बसावा आणि शेतकऱ्यांना दुबार भात पीक घेता यावे म्हणून मोखाड्यातील वनराई संस्था आणि कोसबाड हिल येथील कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ भरत कुशारे पुढे सरसावले आहेत. मोखाड्यातील खोच येथील वनराई संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भरत कुशारे यांनी उन्हाळी मलचिंग भात लागवड, सूर्यफुल लागवड अणि आंबा लागवड तंत्रज्ञान व्यवस्थापन, घन लागवड पद्धत, खत, पाणी व्यवस्थापन, छाटणी, वळण याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

