विक्रमगड तालुक्यात कडधान्य पिकांना बहर

विक्रमगड तालुक्यात कडधान्य पिकांना बहर

Published on

विक्रमगड तालुक्यात कडधान्य पिकांना बहर
थंडी व पोषक वातावरणाचा फायदा; शेतकऱ्यांत समाधान व्यक्त
विक्रमगड, ता. १७ (बातमीदार) ः रब्बी हंगामासाठी तालुक्यात पोषक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, अनेक भागात वाल, हरभरा, पावटा, मूग, चवळी व उडीद ही पिके चांगली बहरली असून, शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
तालुक्यात भात हे मुख्य खरीप पीक असले तरी अनेक शेतकरी रब्बी हंगामात कडधान्य पिकांची लागवड करतात; मात्र डिसेंबर महिन्यातील ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती; परंतु जानेवारी महिन्यात तालुक्यात पोषक वातावरण निर्माण झाल्याने कडधान्य पिकांची वाढ जोमाने होऊ लागली. विशेषतः हरभरा व वाल या पिकांना फुलोरा व शेंगा धरू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे. काही भागांत मूग, चवळी व उडीद पिकेही चांगल्या अवस्थेत असल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवस असेच वातावरण राहिले, तर कडधान्य पिकांचे समाधानकारक उत्पादन मिळण्याची शक्यता असल्याचे शेकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे यंदाचा रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

यावर्षी भातपिकानंतर शेतात मूग, तूर व वाल या कडधान्य पिकांची लागवड केली होती. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ढगाळ व दमट वातावरणामुळे पिकांवर परिणाम होईल, अशी भीती वाटत होती; मात्र जानेवारीत कडाक्याची थंडी आणि पोषक वातावरण मिळाल्याने कडधान्य पिके चांगली बहरली आहेत, यामुळे समाधान वाटत आहे.
- माणिक सांबरे, शेतकरी, विक्रमगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com