अंबरनाथकरांची एकजूट फळाला
अंबरनाथ, ता. १९ (वार्ताहर) : शहराच्या मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकाच्या मेघडंबरीवर पावसाळ्यानंतर साचलेली काजळी अखेर दूर करण्यात आली. नागरिकांच्या जागरूकतेमुळे आणि लोकशक्तीच्या एकजुटीमुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. शनिवारी पहाटेच प्रत्यक्ष स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले. शिवरायांच्या स्मारकाबाबत अंबरनाथकरांच्या भावना लक्षात घेता ही कार्यवाही शहरासाठी दिलासादायक ठरली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे अंबरनाथकरांच्या अस्मितेचे प्रतीक मानले जाते. काही काळापासून मेघडंबरीवर साचलेल्या काजळीमुळे स्मारकाच्या सौंदर्यावर परिणाम होत होता. या बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत होती. पावसाळ्यानंतरही स्वच्छता न झाल्याने शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी होती. स्थानिक कलाकार व सामाजिक कार्यकर्ते मनोज फलके यांनी समाज माध्यमातून या दुरवस्थेकडे सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी मांडलेल्या मुद्द्याला अंबरनाथकरांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली. काही तासांतच हा विषय शहरभर चर्चेचा ठरला. माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी; तसेच अंबरनाथ नगर परिषदेचे अधिकाऱ्यांनी सकाळी साडेसहा वाजल्यापासून प्रत्यक्षस्थळी उपस्थित राहून स्वच्छतेच्या कामाला सुरुवात केली. मेघडंबरीवरील काजळी काढण्यात येताच शिवप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण पसरले. स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर उपस्थित लोकप्रतिनिधींनी जागरूक अंबरनाथकरांचे आभार मानले. नगरसेवक निखिल चौधरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

