आणखी एक ‘वंदे भारत’ २० डब्यांची होणार
आणखी एक ‘वंदे भारत’ २० डब्यांची होणार
स्टॉलचालकांना मात्र चिंता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुंबई सेंट्रल टर्मिनसवरून धावणाऱ्या ‘वंदे भारत’ गाड्यांपैकी आणखी एका गाडीचा रेक १६ डब्यांवरून २० डब्यांचा करण्याची तयारी पश्चिम रेल्वेने केली आहे. दरम्यान, २० डब्यांच्या दुसऱ्या ‘वंदे भारत’ गाडीकरिता आवश्यक इतका लांब प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याने मुंबई सेंट्रलहून सुटणारी कर्णावती एक्स्प्रेस आता वांद्रे टर्मिनस येथून चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या मुंबई सेंट्रल टर्मिनसवरून दोन ‘वंदे भारत’ गाड्या धावत आहेत. त्यापैकी एक गाडी १६ डब्यांवरून २० डब्यांची करण्यात आली आहे. मात्र दुसरी ‘वंदे भारत’ २० डब्यांसह चालवण्यासाठी येथे प्लॅटफॉर्मची लांबी अपुरी ठरत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरून यापूर्वी १६ डब्यांची ‘वंदे भारत’ गाडी चालवली जात होती; मात्र तेथे सुरू असलेल्या विस्तार कामामुळे हा प्लॅटफॉर्म सध्या गाडी परिचालनासाठी बंद ठेवण्यात आला आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसवरून गाड्या वांद्रे टर्मिनसवर शिफ्ट झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांसह स्थानकावरील स्टॉलचालकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. पश्चिम एक्स्प्रेस, गोल्डन टेंपल यांसारख्या गाड्या हलविल्यामुळे प्रवाशांची संख्या घटली असून, त्याचा थेट परिणाम व्यवसायावर होत आहे. एका स्टॉलचालकाने सांगितले, की टेंडर भरताना स्थानकावरून धावणाऱ्या गाड्यांच्या संख्येनुसार कोटेशन दिले जाते; मात्र आता गाड्या शिफ्ट होत असल्याने अपेक्षित व्यवसाय मिळत नाही. परिणामी आमच्या कमाईवरही परिणाम होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

