बार कौन्सिलची ‘एआयबीई’ परिक्षा आता वर्षातून दोनदा
बार कौन्सिलची ‘एआयबीई’ परीक्षा आता वर्षातून दोनदा
मुंबई, ता. २० : देशभरातील कोणत्याही विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या विधी महाविद्यालयांमध्ये ‘एलएलबी’च्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय बार परीक्षा (एआयबीई) यापुढे आता वर्षातून दोनदा देता येणार आहे. यासाठी बार कौन्सिल ऑफ इंडियाने या परीक्षेसाठी काही नियमावली तयार केली आहे. यासाठीची माहिती बार कौन्सिल ऑफ इंडियाने (बीसीआय) मंगळवारी (ता. २०) सर्वोच्च न्यायालयापुढे एका सुनावणीदरम्यान दिली.
कोणत्याही शिक्षण संस्थांमधून विधीची पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना वकील म्हणून कार्यरत होण्यासाठी नोंदणी करण्यापूर्वी एआयबीई ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असते.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर २०२४ मध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेत एलएलबीच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना एआयबीई देण्याची परवानगी देण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती. खंडपीठाने बीसीआयचे निवेदन नोंदवून ही याचिका निकाली काढली. याच पार्श्वभूमीवर बीसीआयकडून एआयबीई ही परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाईल आणि एलएलबीच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीवर या परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाईल, अशी माहिती न्यायालयासमोर दिली. दरम्यान, एखाद्या कायद्याच्या पदवीधराला राज्य बार कौन्सिलकडे वकील म्हणून नोंदणी करण्यासाठी एआयबीई उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास मनाई केल्यास त्यांच्या व्यावसायिक करिअरच्या दृष्टीने मौल्यवान वेळ वाया जाईल, असा युक्तिवादही याचिकेत करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

