आठ दिवसांत मतदारांपर्यंत पोचणार कसे?

आठ दिवसांत मतदारांपर्यंत पोचणार कसे?

Published on

पनवेल, ता. २४ (बातमीदार) : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक जाहीर अर्ज भरून झाले आहेत; मात्र निवडणूक प्रचारासाठी केवळ आठ दिवसांचा कालावधी मिळणार असल्याने २० ते २५ हजार मतदारांपर्यंत पोहोचायचे कसे, असा प्रश्न उमेदवारांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

पनवेल तालुक्यात एकूण आठ जिल्हा परिषद गट व १६ पंचायत समिती गण असून, राजकीयदृष्ट्या पनवेल तालुका महत्त्वाचा मानला जातो. अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्हे मंगळवारी (ता. २७) जाहीर केली जाणार आहेत. त्यानंतरच प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होईल. मतदान ५ फेब्रुवारीला होणार असून, प्रचारासाठी अवघे आठ दिवस उपलब्ध असणार आहेत. एका जिल्हा परिषद गटात आठ ते दहा गावे समाविष्ट असल्याने प्रत्येक गावात जाऊन मतदारांशी थेट संपर्क साधणे अवघड ठरणार आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनाही गटनिहाय सभा घेण्यासाठी वेळेचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. काही इच्छुक उमेदवारांनी मात्र आपली उमेदवारी निश्चित आहे, या समजुतीने आतापासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com