उल्हासनगरात २४ तास पाणीपुरवठा बंद!
उल्हासनगरात २४ तास पाणी कपात
एमआयडीसीच्या दुरुस्ती कामामुळे नागरिक वेठीस
उल्हासनगर, ता. २८ (वार्ताहर) : एमआयडीसीकडून जांभूळ जलशुद्धीकरण केंद्र आणि बारवी गुरुत्ववाहिनीच्या तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे उल्हासनगर शहरातील पाणीपुरवठा गुरुवार, २९ जानेवारी रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून ते शुक्रवार, ३० जानेवारी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सलग २४ तास पूर्णपणे बंद राहणार आहे.
गुरुवारी (ता.२९) मध्यरात्रीपासून शुक्रवार (ता.३०) मध्यरात्रीपर्यंत २४ तास पाणीपुरवठा कपात केला जाणार आहे. यामुळे उल्हासनगर कॅम्प ४, ५ आणि कॅम्प ३ चा काही भाग प्रभावित होणार आहे. शनिवारी (३१ जानेवारी) पाणीपुरवठा पुन्हा सुरू होईल, मात्र तो कमी दाबाने असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या या दुरुस्तीमुळे शहराला होणारा पाणीपुरवठा पूर्णतः खंडित होईल. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेचे कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा विभाग) अशोक घुले यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, उपलब्ध पाणी जपून वापरावे आणि पाण्याचा गैरवापर टाळावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

