आरटीईसाठी अर्ज भरण्यास सुरुवात

आरटीईसाठी अर्ज भरण्यास सुरुवात

Published on

तुर्भे, ता. १७ (बातमीदार) : खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद शिक्षण हक्क कायदा (आरटीई)अंतर्गत करण्यात आली आहे. या योजनेमुळे गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होत आहे. २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, १७ फेब्रुवारी ते १० मार्चपर्यंत पालकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. याबाबतचे अधिकृत परिपत्रक शिक्षण संचालक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले असून, पालकांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी पालकांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्याची माहिती, आवश्यक कागदपत्रे व शाळांची पसंती नोंदवावी लागणार आहे. अर्ज प्रक्रियेनंतर संगणकीय सोडतीद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com