दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू

दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू

Published on

बोळिंज, ता. १ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी (ता. २७) रात्री भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने पायी चालणाऱ्या तरुणाला जोरदार धडक दिली होती. या अपघातात दोघा दुचाकीचालकासह एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
विरार येथे राहणारा शाहरुख फुलजहा खान हा अर्जुन शेट्टीसह महामार्गाने जात होता. चिंचोटी गावाच्या हद्दीत पायी जाणाऱ्या कोल्हीगाव येथील १९ वर्षीय ईश्वर सावला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर दुचाकी रस्त्यावरील लोखंडी बॅरिकेड्सवर आदळली. या अपघातात दुचाकीवरील दोघे तसेच पायी चालणारा तरुण अशा तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणात नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com