तीन दिवसांपासून ४०० शेतकरी अंधारात

तीन दिवसांपासून ४०० शेतकरी अंधारात
Published on

तीन दिवसांपासून ४०० शेतकरी अंधारात
दापचरी दुग्ध प्रकल्पाचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित
कासा, ता.२८ (बातमीदार)ः पालघर तालुक्यातील दापचारी दुग्ध प्रकल्पाचे दहा लाखांचे वीज देयक थकित असल्याने महावितरणकडून पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे तीन दिवसांपासून प्रकल्पातील ४०० हून अधिक शेतकरी अंधारात आहेत.
दापचारी दुग्ध प्रकल्पाची १९७० च्या दशकात स्थापना झाली. त्या काळात युनिटधारक शेतकरी येथे व्यवसाय करत होते. मात्र, सध्या प्रकल्प जीर्ण अवस्थेत असून फार कमी प्रमाणात युनिटधारक कार्यरत आहेत. तरीदेखील वीज देयकांची आकारणी पूर्वीप्रमाणे होत असल्याने घरगुती वापरासाठीही अवास्तव देयके आकारली जात आहेत. अशातच वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना वीज खंडित झाल्याने पालक वर्गात संताप आहे.
---------------------------------------
देयके भरली नसल्यामुळे दुग्ध प्रकल्पाचे वीज जोडणी तोडण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, यासाठी आम्ही बैठक बोलावली आहे.
- सुनील शिंदे, सचिव, प्रकल्प बाधित समन्वय समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com