

तीन दिवसांपासून पाण्याचा थेंब नाही
डोंबिवली एमआयडीसीतील नागरिकांनी खंत
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १ ः डोंबिवली एमआयडीसीच्या कार्यालयावर एमआयडीसी निवासी भागातील रहिवासी आणि मनसेने मोर्चा नेला होता. या वेळी पाणी समस्या किती दिवस सहन करायची, आम्ही पाणी कर भरतो मग पाणी का मिळत नाही, असा प्रश्न मनसे पदाधिकारी आणि नागरिकांनी विचारत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकसभा सचिव राहुल कामत, शहर सचिव अरुण जांभळे, विभाग अध्यक्ष संजय चव्हाण, विभाग सचिव अजय घोरपडे, शाखा अध्यक्ष योगेश माने यांच्यासह रहिवाशांनी डोंबिवली एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढला. गेले तीन-चार दिवस पाणी येत नाही, याचे काय कारण, पाणी समस्या किती दिवस सहन करायची, असा सावल नागरिकांनी अधिकाऱ्यांना विचारला.
तांत्रिक बिघाड
तांत्रिक बिघाड असल्याने कमी दाबाने पाणी आले असून हा त्रास नेहमीच होत नाही, असे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.