पाच दिवस वाहतुकीत बदल

पाच दिवस वाहतुकीत बदल
Published on

ठाणे शहर, ता. २८ (बातमीदार) : श्री साईबाबा ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या साईबाबा मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त ठाण्याच्या कापूरबावडी परिसरात २ मेपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून वाहतुकीमध्ये बदल करण्यात येत असल्याचे वाहतूक विभागाने कळवले आहे.

सोमवार (ता. २७)पासून २ मेपर्यंत होणाऱ्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमानिमित्त पाच दिवस सायंकाळी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत हे बदल असणार आहेत. तसेच पोलिस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे बदल लागू राहणार नाहीत, अशी माहिती ठाणे वाहतूक विभागाने दिली आहे.

प्रवेश बंद - साकेतकडून बाळकुम मार्गे कशेळी आणि बाळकुम नाका, लोढा कट

पर्यायी मार्ग - महालक्ष्मी मंदिर येथून डावीकडे वळण घेऊन रुस्तमजी समोरील कटमधून वाहने बाहेर पडून नाशिक-मुंबई महामार्गावरून बाहेर पडतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com