अकरावी प्रवेश प्रक्रिया वेळेत पार पाडावी,भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. पाटील यांची मागणी

अकरावी प्रवेश प्रक्रिया वेळेत पार पाडावी,भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. पाटील यांची मागणी
Published on

अकरावी प्रवेश प्रक्रिया वेळेत पार पाडावी
नेरूळ, ता. ११ (बातमीदार) ः अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडू नये, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. दरवर्षी प्रवेशाच्या फेऱ्या सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत चालतात, यामुळे विद्यार्थ्यांचे पाच-सहा महिने वाया जातात. यंदा ही प्रक्रिया जुलैपर्यंत पूर्ण करून ५ जुलैपासून नियमित वर्ग सुरू करावेत, असे पत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com