

अकरावी प्रवेश प्रक्रिया वेळेत पार पाडावी
नेरूळ, ता. ११ (बातमीदार) ः अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडू नये, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. दरवर्षी प्रवेशाच्या फेऱ्या सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत चालतात, यामुळे विद्यार्थ्यांचे पाच-सहा महिने वाया जातात. यंदा ही प्रक्रिया जुलैपर्यंत पूर्ण करून ५ जुलैपासून नियमित वर्ग सुरू करावेत, असे पत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.