

तापमानाचा पारा ४१ अंशांवर
वाडा तालुक्याला औद्योगिकीकरणाचा फटका
वाडा, ता. ११ (बातमीदार) ः तालुक्याचे तापमान सोमवारी ४१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे शेती, जंगल असलेल्या परिसराला लोखंड बनविणाऱ्या कंपन्यांमुळे फटका बसल्याचे चित्र आहे.
वाडा तालुक्यात औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. सद्यपरिस्थितीत ३५ ते ४० टक्के कारखाने लोखंड बनविणारे आहेत. दिवसरात्र सुरू असलेल्या कारखान्यांतील भट्ट्यांमुळे तापमानाचा पारा चढल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या कारखान्यांकडून पाण्याच्या मोठ्या प्रमाणात उपशामुळे पाणीपातळी खालावली आहे.
--------------------------
वाडा तालुक्यात २५० ते ३०० फुटांवर पूर्वी पाणी लागत होते; मात्र आता ४०० ते ५०० फुटांवर पाणी लागते. लोखंड बनविणाऱ्या कारखान्यामुळे पाण्याच्या पातळीत घट झाली आहे.
- श्रीकांत भोईर, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.