
वासांबे मोहोपाडा येथे जलवाहिनी फुटली, पाणी वाया जात असल्याने नाराजी
पाताळगंगातील जलवाहिनीला गळती
कमी दाबाने पुरवठा होत असल्याने नागरिकांत नाराजी
रसायनी, ता. २९ (बातमीदार) : पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कामगार वसाहतीत एमआयडीसीची जलवाहिनीला गळती लागली आहे. शहरात एकीकडे पाणीटंचाई जाणवत असून नागरिकांना कमी दाबाने पुरवठा होत आहे, तर दुसरीकडे गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
एमआयडीसीतर्फे कामगार वसाहतीतील अनेक कंपन्या तसेच ११ रहिवासी सोसायट्यांना पाणीपुरवठा करण्यात येतो. दरम्यान जुन्या कामगार वसाहत आणि इनॉक्स इअर प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीजवळ अशा दोन ठिकाणी ठिकाणी काही दिवसांपूर्वी जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत असून नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तरी दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विनायक भोईर यांनी केली आहे.
रसायनी ः