धो-धो कोसळणा-या सरींमुळे व्यवहार ठप्प.

धो-धो कोसळणा-या सरींमुळे व्यवहार ठप्प.

Published on

धो-धो पावसामुळे व्यवहार ठप्प
रेवदंडा, ता. १९ (बातमीदार) : आठवडाभरापासून कोसळणाऱ्या पावसामुळे नद्या, नाले ओसंडून वाहत असून अनेक तलाव भरले आहेत. बुधवारी (ता. १८) मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्‍याने गुरुवारी (ता. १९) सकाळी बाजारपेठेत शुकशुकाट जाणवला. नागरिक घराबाहेर न पडण्याचे टाळल्‍याने सर्व व्यवहार थंडावले होते. एसटीचे वेळापत्रक कोलमडल्‍याने प्रवाशांचे हाल झाले. सरकारी कार्यालयातील उपस्थिती तसेच कामासाठी येणाऱ्यांची संख्या घटली होती. टपाल, पतसंस्था, बँकांमधील व्यवहार करण्यासाठी ग्राहकांची वर्दळ जाणवली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्वच शाळांना सुट्टी जाहीर केली होती. भाजी व फुलबाजारातील व्यवहार पूर्णपणे थंडावला होता. सखल भागात पाणी साचले तर चौल-रेवदंडामधील अंतर्गत रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यांमुळे चालकांचा प्रवास जिकिरीचा झाला होता.

...................

पोलादपूरमध्ये नद्या दुथडी भरून
पोलादपूर (बातमीदार) ः रायगड जिल्ह्यामध्ये बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्‍या मुसळधारेने पोलादपूर तालुक्याला अक्षरशः झोपून काढले. सावित्री नदीसह इतर उपनद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. तसेच महाबळेश्वर व प्रतापगड भागातदेखील पावसाचा जोर कायम असल्यामुळे नदीचा प्रवाह वाढल्‍याचे दिसून आले. प्रशासनाकडून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना दिल्‍या आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा वेग गुरुवारी मंदावला होता. पावसाचा जोर असाच वाढत राहिला तर पूरस्‍थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. आपत्‍कालीन परिस्‍थितीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्‍ज असून नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे.

-----------------------------
माणगावमध्ये शेती पाण्याखाली
माणगाव, ता. १९ (बातमीदार) ः तालुक्यात २४ तासांपासून सुरू असलेल्‍या धुवाधार पावसाने परिसरातील सर्व नाले, नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. माणगावमध्ये पूरसदृशस्थिती निर्माण झाली असून बहुतांश शेती पाण्याखाली गेली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
माणगाव तालुक्यातील गावांमध्ये नद्यांचे पाणी शिरू लागल्‍याने ग्रामस्‍थ भयभीत झाले आहेत. काळ नदी, गोद नदी दुथडी भरून वाहत आहेत. पाणी तुंबल्‍याने ग्रामीण भागाला जोडणारे बहुतांश मार्ग बंद झाले आहेत. इंदापूर, निजामपूर-वाकी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आले आहे. तसेच गोद नदीचे पाणी आल्‍याने रिळे- पाचोळे गावाकडे जाणारा रस्‍ता पाण्याखाली गेला, तसेच रस्‍त्‍यालगतची शेतीही पूर्णतः पाण्याखाली गेली. मोर्बा रस्‍त्‍यावरील पुलावरूनही पाणी गेल्‍याने नागरिकांचे हाल झाले.

माणगाव ः
----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com