पावसामुळे ‘दिवाळी सुट्टी’ पाण्यात

पावसामुळे ‘दिवाळी सुट्टी’ पाण्यात

Published on

पावसामुळे ‘दिवाळी सुट्टी’ पाण्यात
रेवदंडा (बातमीदार) ः यंदाची दिवाळी सुट्टी अक्षरशः पावसाच्या सरींमध्येच वाहून गेली. सुट्टी लागल्यापासून पावसाने पाठच सोडली नाही, परिणामी शहरी तसेच ग्रामीण भागातील मुलांना सुट्टीचा आनंद घेता आला नाही. फटाक्यांची आतषबाजी न झाल्याने दिवाळीचा उत्साह काहीसा फिका पडला, तर शाळकरी मुलींना रांगोळीच्या रंगांत रंग भरता आले नाहीत. अनेक जण आपल्या आवडत्या सुट्टीतील किल्ल्यांचे बांधकामही या मुसळधार पावसामुळे पूर्ण करू शकले नाहीत. ग्रामीण भागातील शेतकरी मुलांनी मात्र या सुट्टीचा वेगळाच उपयोग केला. आई-वडिलांना शेतात मदत करत शेतातील तयार झालेले सोने, म्हणजेच धान्य घरी आणण्याचे काम त्यांनी उत्साहाने पार पाडले. त्याउलट शहरांमध्ये काही मुले पावसाच्या फटकाऱ्यांकडे दुर्लक्ष करत पर्यटनस्थळांकडे रवाना झाली होती. या दोन्ही वातावरणामुळे सुट्टीचा रंग प्रत्येकासाठी वेगळा ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com