रानभाज्या विक्रीच्या हंगामाला लॉकडॉऊनचा फटका; अदिवासी बांधवांची होतेय उपासमार

रानभाज्या विक्रीच्या हंगामाला लॉकडॉऊनचा फटका; अदिवासी बांधवांची होतेय उपासमार


पाली, : रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवार (ता. 16)पासून सुरू 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर झाला आहे; मात्र यामुळे रायगड जिल्ह्यातील हातावर पोट असलेल्या भाजीपाला व मासळी विक्री करणाऱ्या आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे.

वारंवार होणारा लॉकडाऊन आदिवासी व गरीब विक्रेत्यांना परवडणारा नाही. सध्या रानभाज्या व गोड्या मासळीचा हंगाम सुरू आहे. आदिवासी बांधव रानातून भाजीपाला व नदी ओहळातून मासळी पकडून ती घेऊन बाजारात विक्रीसाठी येतात; मात्र लॉकडाऊनमुळे हा हंगाम जात असून, त्यांचा रोजगारही हिरावतो. सुधागड तालुक्यातील वंदना वारे या आदिवासी भाजी विक्रेत्याने सांगितले की, कोरोनाच्या सुरक्षेसाठी लॉकडाऊन ठीक आहे; मात्र हातात कामधंदा नाही तर घरी बसून रोजचे पैसे आणायचे कुठून, असा सवाल त्यांनी केला आहे. शनिवारी (ता. 18)पासून सकाळी 6 ते 11 भाजी, मासळी विकण्यास परवानगी मिळाली आहे; मात्र लॉकडाऊन असल्यामुळे सार्वजनिक व खासगी वाहतूक बंद आहे. अशावेळी डोंगर खोऱ्यात राहणारे आदिवासी बाजारापर्यंत आपला भाजीपाला कसा आणणार, असे वामन वारे या आदिवासी बांधवांनी सांगितले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सुरक्षेसाठी केलेल्या लॉकडाऊनला आमचा विरोध नाही; मात्र सरकारने हातावर पोट असणाऱ्यांचाही विचार केला पाहिजे. त्यांची रोजीरोटी सुरू ठेवण्यासाठी काही सूट दिली पाहिजे. तसेच रोहयोतून व इतर शासकीय योजनांतून हाताला काम दिले पाहिजे. 
- रमेश पवार, कोकण संघटक, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तथा अध्यक्ष, अनुसूचित जमाती, रायगड, लोकसंजीवनी प्रतिष्ठान 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com