
उल्हासनगर : महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी उल्हासनगरकरांसाठी मालमत्ता कर भरण्यासाठी तीन टप्यात अभययोजना लागू केलेली आहे.24 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान हे तीन टप्पे विभागून देण्यात आले आहेत.मात्र 100 टक्के व्याज व दंड माफीच्या पहिल्या टप्यातील 6 दिवसातच तब्बल 12 कोटी रुपयांची वसुली झाल्याने पालिकेने रेकॉर्ड ब्रेकला गवसणी घालणार असल्याची बोलकी आकडेवारी समोर येऊ लागली आहे.