मंगळवारपासून उल्हासनगर शहर कडकडीत बंद, आयुक्तांनी दिले OK"हे" आदेश

मंगळवारपासून उल्हासनगर शहर कडकडीत बंद, आयुक्तांनी दिले OK"हे" आदेश

उल्हासनगर) : अंबरनाथ शहरात कोरोनाचा रुग्ण दगावला असून कल्याणला रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. सध्या तरी उल्हासनगरमध्ये एकही रुग्ण नसून त्यानुषंगाने गर्दीवर पूर्णतः नियंत्रण मिळवण्यासाठी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आज (ता.7) पासून सायंकाळी 5 नंतर 100 टक्के लॉकडाऊन जाहीर केले आहे. तसे आदेश आयुक्तांनी जारी केले आहेत.

तीन तारखेला आयुक्त देशमुख यांनी केवळ भाजीपाला मार्केट्स, हातगाड्या सायंकाळी 5 नंतर बंद ठेवल्या होत्या. 4 तारखेला चिकन-मटण, फळ विक्रेत्यांची दुकानेही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. किराणा दुकाने, दुध डेअरी यांना रात्री 10 पर्यंतची वेळ देण्यात आली होती. यावेळी गर्दी दिसल्यास याबाबतही भाजीपाला मार्केट्स प्रमाणे पवित्रा घ्यावा लागणार असा इशारा देखील देशमुख यांनी दिला होता. 

मात्र खरेदीच्या बहाण्याने नागरिक रात्री 10 पर्यंत बाहेर जात असल्याचे निदर्शनास येताच आयुक्त सुधाकर देशमुख यांनी तडकाफडकी जारी केलेल्या आदेशात उद्यापासून औषध दुकाने वगळता सायंकाळी 5 नंतर संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, अजय एडके, भगवान कुमावत, तुषार सोनवणे यांना दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com