

Farmers Reeling from Heavy Losses as Unseasonal Weather Ravages Crops Across the State
sakal
मुंबई : नुकत्याच झालेल्या गारपिटीसह बिगरमोसमी पाऊस अन् वादळी वाऱ्यामुळे राज्यातील शेतीला जोरदार फटका बसला असून, ५६ हजार ५३३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या अहवालानुसार, या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील २४ जिल्ह्यांतील फळबागा, भाजीपाला आणि विविध हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.