

Vasai Virar municipal corporation
विरार - वसई-विरार शहरातील सांडपाणी व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर महानगरपालिकेला अनेकवेळा नगरसेवकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घेरले असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी प्रक्रिया न करताच खाडीत सोडल्या जाणाऱ्या मैल्यावर आता प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी प्रकल्प उभारणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. नवघर येथील सहा एकर जागेत हा प्रकल्प उभारला जाणार असून त्यासाठी जवळपास ७ ते ८ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.