अखेर एपीएमसी मार्केट आठ दिवसांसाठी बंद

APMC-Vashi
APMC-Vashi

तुर्भे (बातमीदार) : कोरोनाच्या वाढत्या फैलावामूळे एपीएमसी मार्केट बंद करावी यासाठी तरुणांनी समाज माध्यमातून मोहिम राबविली होती. या मोहिमेचा वाढता प्रतिसाद पाहुन पुढील आठ दिवस  एपीएमसी बंद ठेवण्याचा मागणीवर शिक्कामोर्तब झाले आहे. 

मोठी बातमी ः सलाम 'त्यांच्या' कार्याला ! 'ते' सुद्धा करताय जीव धोक्यात घालून काम

नवी मुंबई शहरात 7 मे रोजी कोरोनाचा आकडा थेट 448 वर पोहोचला. 8 जणांनी या कालावधीत जीव गमावला आहे. तरदोन महिन्यात 448 रुग्णांमधील 125 रुग्ण एपीएमसी संबंधित आहेत. अखेरीस पणन खात्याचे सचिव अनुपकुमार यांच्या उपस्थितीमध्ये तुर्भे येथील एपीएमसी मुख्यालयात बैठक पार पडली. शुक्रवारी झालेल्या बैठकीत सोमवार पासून पुढील 8 दिवस भाजीपाला, कांदा बटाटा, फळ, धान्य आणि मसाला हे पाच मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार गणेश नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, शिवसेना उपनेते विजय नाहटा, विविध सामाजिक संघटना नागरिकांनी थेट मागणी केल्याने शासनाने दखल घेऊन एपीएमसी तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार पासून 17 मे पर्यंत एपीएमसीत पाचही मार्केट राहणार बंद

एपीएमसी प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीत कोकण आयुक्त शिवाजी दौंड, पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महापालिका आयुक्त आणासाहेब मिसाळ, पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, माथाडी नेता नरेंद्र पाटील आणि एपीएमसीचे संचालक प्रमुख व्यापारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com