Sakal Impact : मोखाडा तालुक्यात पाण्याचे टँकर धाऊ लागले; तहानलेल्या गावपाड्यांना पाणी मिळाले

मोखाडा तालुक्यात जलजीवन मिशन योजनेची कामे अपुर्णावस्थेत आहेत. तर विहीरी कोरड्या पडल्या आहेत.
water issue
water issuesakal
Updated on

मोखाडा - मोखाडा तालुक्यात जलजीवन मिशन योजनेची कामे अपुर्णावस्थेत आहेत. तर विहीरी कोरड्या पडल्या आहेत. टॅकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी करुन ही टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा न करता, टॅकर मुक्त मोखाडा तालुका, दाखवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला होता.

या घटनेचे वास्तव सकाळ ने 23 फेब्रुवारीला 'मोखाडा तालुक्यात पाणी टंचाईचे विघ्न' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करून समोर आणले. त्याची तातडीने दखल घेत प्रशासनाने टंचाईग्रस्त गावपाड्यांना 24 फेब्रुवारी पासून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे येथील नागरीकांना दिलासा मिळाला आहे.

पाणीटंचाई वर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार ने जलजीवन मिशन योजनेंतर्गत 'हर घर नल से जल' ही महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे. मात्र, मोखाडा तालुक्यात या योजनेचे पाणी पोहोचलेले नाही. त्यातच मोखाड्यात विहीरींनी तळ गाठल्याने, गोमघर, सायदे, पाथर्डी आणि सुर्यमाळ या ग्रामपंचायतींनी आपल्या क्षेत्रातील टंचाईग्रस्त गावपाड्यांना टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी पंचायत समिती प्रशासनाकडे केली होती.

मात्र, सरकारी धोरण धाब्यावर बसवून या मागणीकडे प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले होते. टंचाईग्रस्त गावपाड्यांना टँकरने पाणी पुरवठ्याची मंजुरी असतांना, तसेच तेथे कुठलीही पाण्याची सुविधा नसतांना, तालुका टॅकरमुक्त दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता.

त्यामुळे टंचाईग्रस्त गावपाड्यांतील आदिवासी महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. या भीषण स्थितीचे वास्तव 'सकाळ'ने 23 फेब्रुवारीला रविवारच्या अंकात 'मोखाडा तालुक्यात पाणीटंचाईचे विघ्न' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करुन चव्हाटय़ावर आणले. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली.

अखेर, दुसर्‍याच दिवशी सोमवारी 24 फेब्रुवारीला प्रशासनाने, गोमघर, वाघवाडी, दुधगाव, सायदे जांभुळवाडी, पाथर्डी हेदवाडी आणि सुर्यमाळ मधील केवनाळे येथे दोन टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे येथील महिलांना दिलासा मिळाला असुन त्यांनी सकाळ चे आभार मानले आहे.

टॅकरच्या मंजुरीनंतर ही पाणी पुरवठा नाही....

मोखाडा तहसीलदार मयुर खेंगले यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार टॅंकरद्वारे पाणी पुरवठा मागणीचे प्रस्ताव येताच, त्यांना तातडीने उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून मंजुरी देण्यात येते. तालुक्यातील टंचाईग्रस्त गावपाड्यांचे सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

टॅकर मंजुरीनंतर सुमारे 15 ते 20 दिवसांनी पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. दरम्यानच्या काळात नागरीकांना पाण्यासाठी तडफडत ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई ची मागणी येथील नागरीकांनी केली आहे.

आमच्या ग्रामपंचायतीमधील गोमघर, दुधगाव आणि वाघवाडी येथे पाणीटंचाई निर्माण झाल्याने, टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी केली होती. मात्र, दहा दिवस ऊलटुनही त्याची प्रशासनाने दखल घेतली नाही. मात्र, सकाळ ने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर दुसर्‍याच दिवसांपासून टंचाईग्रस्त गावपाड्यांत टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरु झाला आहे.

- सुलोचना गारे, सरपंच, गोमघर- वाशिंद ग्रामपंचायत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com