इस्रो भेदणार सूर्यमंडळ

मुंबई ः  टेकफेस्टमध्ये देशभरातून आणि विदेशातूनही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी हजेरी लावली आहे. टेकफेस्टच्या प्रवेशद्वारावरील कलाविष्कार विशेष आकर्षण ठरले आहे.
मुंबई ः टेकफेस्टमध्ये देशभरातून आणि विदेशातूनही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी हजेरी लावली आहे. टेकफेस्टच्या प्रवेशद्वारावरील कलाविष्कार विशेष आकर्षण ठरले आहे.

मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) २०२२ मध्ये अंतराळात मानवाला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्र आणि मंगळावर स्वारीपुरते मर्यादित न राहता सूर्यमंडळ भेदून बाहेर जाण्याचा इस्रोचा विचार आहे, असे ‘ज्ञानगंगा’ मोहिमेच्या संचालक डॉ. व्ही. आर. लताअंबिका यांनी शुक्रवारी सांगितले.

पवई येथील मुंबई आयआयटीच्या टेकफेस्टमध्ये डॉ. लताअंबिका बोलत होत्या. मानवाच्या संशोधक बुद्धीमुळेच आपण अंतराळात पोहोचू शकलो आहोत. दोन महायुद्धांनंतर शीतयुद्धाच्या काळात अंतराळ संशोधनात मोठी प्रगती झाली. देशांमधील चढाओढीमुळेच ही प्रगती झाली, असे त्या म्हणाल्या.

अंतराळ संशोधनात आता भारतही वेगाने पुढे जात आहे. मानवाला अंतराळात पाठवणे, केवळ हेच भारताचे उद्दिष्ट नाही. त्यापुढे जाऊन आपण सूर्यमंडळ भेदून जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. सूर्यमंडळ भेदून बाहेर जाण्यासाठी अग्निबाणाचा वेग प्रकाशवेगाच्या एक पंचमाशापर्यंत जाण्याची गरज असते. सूर्यावरून प्रकाश अवघ्या आठ मिनिटांत पृथ्वीवर पोहोचतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com