
नांदेड : जिल्ह्यात गोदावरी नदी आणि इतर लहान-मोठ्या नद्या असून, भरपूर पाऊस झाल्यास जवळपास ३३७ गावांना पुरांचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे मॉन्सून काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या विभाग प्रमुखांनी योग्य ती खबरदारी घेऊन मॉन्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.