Nanded News
Manspuri Bachoti bridge flooded againesakal

Nanded Flood Bridge Issue : मानसपुरी बाचोटीचा पूल नेहमीच जातो पाण्याखाली; कंधार नरसी मार्गावरील ५० गावांचा तुटतो संपर्क, उंची वाढविणे गरजेचे

Kandahar Bridge Issue : कंधार-नरसी मार्गावरील तीन जुने पूल पावसात दरवर्षी पाण्याखाली जातात. त्यामुळे ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटतो आणि नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो.
Published on

कंधार : कंधार-बारूळ-नरसी मार्गावरील कंधार तालुक्यातील मानसपुरी-बाचोटी गावाजवळील तीन पुलाची उंची कमी असल्याने ते पाण्याखाली जातात. परिणामी, ५० गावांचा संपर्क तुटतो. अनेक नागरिक, विद्यार्थी, शेतकरी पुलावरून वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करीत आहेत.  पावसाळ्यात नेहमीच उद्‍भवणाऱ्या या गंभीर बाबीकडे आता तरी लक्ष देऊन रस्त्याच्या रुंदीकरणासह धोकादायक पुलांची उंची वाढवण्याची मागणी होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com