

Nanded News
esakal
अर्धापूर: नदीपात्रातील साचलेला गाळ काढल्यामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. तसेच शेतीला मोठा फायदा होऊन पाणीटंचाई दूर करण्यास हातभार लागतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. अर्धापूर तालुक्यातील पार्डी (मक्ता) येथे गुरुवारी (ता. २६) `गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या जलसंधारण कामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.