

E-Peek App
esakal
बिलोली: मागील आठ दिवसांपासून ई पीक ॲपवर रब्बी हंगामातील हरभरा, तूर पिकाची नोंद घेता येत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. नोंदणीअभावी शेतकऱ्यांना हमीभाव खरेदी केंद्रांवर हरभऱ्याची विक्री करता येत नाहीये.
त्यामुळे ऑनलाइन नोंदीसाठी मुदत वाढून मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. बाजारात हरभरा आणि तूर या प्रमुख कडधान्यांच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत.