कोरोना ब्रेकिंग - आजही पाच पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू  

File Photo
File Photo

नांदेड :  दोनदिवसांपूर्वी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोन बाधीत रुग्णांचा रविवारी (ता. पाच जुलै) सकाळी मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगीतले.

देगलुर येथील ५७ वर्षीय व्यक्तीचा तर इदगाह रोड बिलोली येथील ६५ वर्षीय महिलेचा दोन दिवसांपूर्वीच पॉझिटिव्ह अहवाल आला होता. परंतु त्यांच्याकडून उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने रविवारी सकाळी या दोन्ही रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा आता २० वर गेला आहे. तसेच रविवारीही सकाळच्या अहवालामध्ये नव्याने पाच रुग्ण बाधीत झाल्याने जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४२८ इतकी झाली आहे. रविवारी सकाळी प्राप्त झालेल्या १९ स्वॅब अहवालात १२ जणांचे अहवाल निगेटिव्ह, पाच जणांचे पॉझिटिव्ह तर दोन अहवाल अनिर्णित ठेवण्यात आल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले आहे. 

महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मृत्यू      

नव्याने सापडलेले पाच रुग्णांमध्ये तीन महिलांचा तर दोन पुरुषांचा समावेश आहे. उमर कॉलनी देगलुरनाका पुरुष (३२), नवीन हस्सापूर पुरुष (५९), हबिबिया कॉलनी इतवारा महिला (२४), मंगळवार पेठ जिल्हा हिंगोली महिला (२४), इदगाह रोड बिलोली येथील ६५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.      

कोरोनाची संक्षिप्त माहिती 

- आज सकाळी - पाच रुग्ण पॉझिटिव्ह 
- एकूण रुग्णसंख्या -४२८ 
- बरे झालेले रुग्ण-३१० 
- उपचार सुरु- ९८
- मृत्यू- २०

बाधीत रुग्णांची चैन कमी होईल असे वाटत असतानाच जिल्ह्यात रोज नव्याने बाधीत रुग्णांची भर पडल असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता कायम आहे. जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची साखळी तोडण्याचा प्रयत्न होत असला तरी, पॉझिटिव्ह रुग्णसंख्या काही कमी होण्याचे नाव घेईना असेच चित्र आहे. जिल्ह्यातील बाधीत रुग्णांच्या मृत्यूचा आकडा देखील हळुहळु वाढतच आहे. 

रुग्णसंख्या ४२८ 

शनिवारी दिवसभरात नऊ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. सायंकाळपर्यंत चार रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर ११६ संशयित रुग्णांचे स्वॅब अहवाल तपासणी साठी घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. रविवारी यातील काही व्यक्तींचे स्वॅब आले असून, यामध्ये पुन्हा पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या ४२८ इतकी झाली आहे.   

शहराबरोबरच ग्रामीण भागात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गाव खेड्यांना कोरोना पासून दूर ठवण्याचा कितीही प्रयत्न होत असला तरी, त्यास पुरेशे यश येत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून गावच्या सुरक्षेसाठी आणखी कुठले पावले उचलता येतील यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टर मंडळीकडून व्यक्त केले जात आहे. 


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com