Nanded News: देगलूरवर तीव्र पाणीटंचाईचे सावट; निवारणार्थ बैठकीचा मुहूर्त लागेना, नियोजन प्रक्रियेलाच लागली खीळ

Deglur Faces Severe Water Shortage: नियोजनातील उणीवा, उपाययोजनांचा अभाव आणि निर्णय प्रलंबित ठेवण्यामुळे शहरासह ग्रामीण भागात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे.
Nanded News

Nanded News

esakal

Updated on

देगलूर: यावर्षीही पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकींना प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याची बाब समोर आली. बैठकीसाठी वारंवार आवाहन करूनही यंत्रणा उपस्थित राहत नसल्याने नियोजन प्रक्रियेलाच खीळ बसत आहे.

पाणीटंचाईसारख्या ज्वलंत प्रश्नावरही अधिकारी-कर्मचारी उदासीन असल्याचे चित्र आहे. वेळेवर बैठका न घेणे, निर्णय प्रलंबित ठेवणे आणि प्रत्यक्ष कामांकडे दुर्लक्ष करणे यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनत आहे. दरम्यान, येथील पाणीपुरवठा विभागाचे अभियंता जाधवर हे खात्यांतर्गत प्रशिक्षणासाठी नाशिक येथे गेलेले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com