Nanded News : अंकाई ते संभाजीनगरचे दुहेरीकरण कधी?; मंजुरीनंतरही प्रतीक्षाच, क्रॉसिंगमुळे मराठवाड्यातील रेल्वेला विलंब

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात परभणी-नांदेड-मुदखेड असे ८३ किलोमीटर लोहमार्गाचे दुहेरीकरण झाले. परभणी-मनमाड २९० किलोमीटर लोहमार्गाच्या दुहेरीकरणांपैकी ९८ किलोमीटरला अंकाई ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान गतवर्षी मंजुरी मिळाली.
Nanded News
Nanded Newssakal

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात परभणी-नांदेड-मुदखेड असे ८३ किलोमीटर लोहमार्गाचे दुहेरीकरण झाले. परभणी-मनमाड २९० किलोमीटर लोहमार्गाच्या दुहेरीकरणांपैकी ९८ किलोमीटरला अंकाई ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान गतवर्षी मंजुरी मिळाली. परंतु, प्रत्यक्षात या कामाला सुरवात झाली नाही. त्यामुळे या मार्गावर क्रॉसिंगसाठी थांबावे लागत असल्याने रेल्वेंना उशीर होत आहे.

नांदेड विभागात एकूण पाच प्रमुख रेल्वेस्थानक आहेत. त्यामध्ये नांदेड, पूर्णा, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश आहे. नांदेड ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरून दैनंदिन ३० ते ४० प्रवासी व मालवाहतूक रेल्वे धावतात. मराठवाड्यात नांदेड विभागात नुकतेच शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले.

पुढील काही दिवसांत नांदेड विभागातून जाणाऱ्या प्रवासी रेल्वेंचा वेग वाढणार आहे. असे असले तरी परभणी ते छत्रपती संभाजीनगर एकेरी मार्ग आहे. त्यामुळे बहुदा नांदेड-पुणे-नांदेड (१७६२९/३०) मनमाडमार्गे या रेल्वेला बदनापूर, करमाड, चिखलठाणा येथे जालना-मुंबई-जालना ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मुळे क्रॉसिंग घेण्यात येते. परिणामी, परभणी ते छत्रपती संभाजीनगर प्रवास करण्यासाठी जवळपास साडेतीन तासांवर वेळ लागत आहे. परभणी ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान दुहेरीकरण झाल्यास येणारी क्रॉसिंग थांबविता येईल; तसेच वेगमर्यादाही वाढेल.

अंकाई ते छत्रपती संभाजीनगर दुहेरीकरणासाठी टेंडर काढून भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली; तसेच यामध्ये काय करता येईल, याचे नियोजनही करण्यात आले आहे. लोहमार्गाच्या बाजूचे गेट बंद करण्यात येत आहेत. लवकरच ही कामे पूर्ण होतील.

- नीती सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभाग.

दुसरा पर्याय काय असेल?

याशिवाय नांदेड-पुणे-नांदेड ही रेल्वे नांदेडवरून दुपारी साडेचार अथवा पाचला सोडावी, जेणे करून नांदेड-पुणे-नांदेड या रेल्वेची क्रॉसिंग जालन्यातून घेता येईल. या रेल्वेत काही दिवसांपासून बदनापूर येथे चोरीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीती आहे. जालना येथे क्रॉसिंग घेतल्यास चोरीच्या घटना टाळता येतील आणि साडेतीन तासांऐवजी अर्धा तास कमी होऊन तीन तासातच गाडी पोचेल, असे रेल्वे प्रवासी महासंघाने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com